
जनधन खातेदारांनी आपली केवायसी करून घ्यावी सचिन शेंडे निदेशक रिझर्व बँक यांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन ज्यानागरीकांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत आज पर्यत नव्हते त्याचे नविन योजने अंतर्गत खाते सन 2014- 15 मधे जनधन खाते संपूर्ण देशभरात उघडण्यात आली होते सदर खात्यामध्ये रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे दहा वर्षानंतर केवायसी ही प्रक्रिया करावयाची असते त्यासंबंधी पंतप्रधान मोदिंनी आवाहन करून जनजागृती मोहीम देशभर राबविण्याचे आवाहन केले आहे त्या आवाहनाला रिझर्व बँक च्या पुढाकाराने सर्वच बँक जनधन खात्यातील खातेदारांनी आपली केवायसी करून घ्यावी तसेच आर्थिक साक्षर व सुरक्षितता करून घ्यावी असे आवाहन रिझर्व बँक चे निरीक्षक सचिन शेंडे यांनी केले आहे दिनांक 8 सप्टेंबर रोजी काही केसरबाई देशमुख सभागृहात भारतीय स्टेट बँक गांधी चौक शेगाव यांच्या पुढाकाराने जनधन खात्यातील केवायसी व आर्थिक साक्षरता व खात्याची सुरक्षितता यासंबंधी जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सचिन शेंडे यांनी सर्वच ग्राहकांना आवाहन केले की जनधन खात्यातील सर्व ग्राहकांनी केवायसी करून घेणे अनिवार्य असल्यामुळे तातडीने बँकांशी संपर्क साधून आपल्या खात्याची केवायसी करून घ्यावी व आपले खाते सुरक्षित व सुरळीत करून घ्यावे असे त्यांनी म्हटले आहे तसेच केवायसी करण्यासाठी शासकीय बँका ग्राहक सेवा एटीएम मोबाईल बँकिंग ग्रामपंचायत या सर्व स्तरावर ती सेवा देण्यात येत आहे जेणेकरून या खात्यातील कोणताही ग्राहक केवायसी पासून वंचित राहू नये यावेळी किस्ले कुमार सहाय्यक महाप्रबंधक स्टेट बँक, श्री पंकज कुमार क्षेत्रीय प्रबंधक सेंट्रल बँक, डॉक्टर अशोक खरात सीईओ बुलढाणा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव बँक केके सिंग एल डी एम हे मान्यवर अधिकारी मंचावर उपस्थित होते सर्व खातेदारांनी आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी जामदार यांचे आवाहन30सप्टेंबर 2025पर्यत शेगांव शाखेतील जनधन खातेदारांनी आपली kyc करुन घ्यावी जनधन खात्यातील सर्व खातेदारांनी बँकेशी संपर्क साधून किंवा दिलेल्या सेवा केंन्द्रांच्या सुविधांचा उपयोग करून आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन भारतीय स्टेटबँक गांधी चोक शेगाव चे व्यवस्थापक गौरव जामदार यांनी केले आहेजनधन खातेदाराला विम्यापोटि 2लाख जनधन खातेदार यांच्या अपघाती निधना मुळे त्यांचे वारस विजय ओंकार सैरसे यांना प्रति वर्ष 20 रुपये प्रमाणे प्रीमियम असलेला विमा च्या मोबदल्यात 2लाख रुपये भरपाई देण्यात आले त्यामुळे खातेदारांनी आपल्या खात्यासोबत बँकेतील विमा अवश्य लाभ घ्यावे असेहि आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाचे सुत्र संचलन गौरव जामदार यांनी केले तसेच प्रास्ताविक किस्ले कुमार यांनी केले आभार प्रदर्शन रोहित गाढे यांनी केले यावेळी शेगाव शहरातील सर्व बँकांचे कर्मचारी अधिकारी कॉपरेटिव्ह बँकांचे अधिकारी कर्मचारी व नागरिक महिला बचत गट , खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होतेमराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी अमीन शेख ससंपादक शेगाव
