
मागण्या पूर्ण व्हाव्यात नाही तर प्राणांतिक उपवास करेल:: नागेश्वर जी.पाटेकर
शेगाव प्रतिनिधी
शेगाव,ए.बी.एस.क्रांती सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतिने बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे दिला उपोषणाचा इशारा,त्या वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नागेश्वर जी.पाटेकर यांनी सांगितले की गेली अनेक वर्षं झाली आम्ही संविधनिक मार्गाने स्थानिक स्वराज्य संस्था किंवा तहसील कार्यालय शेगांव येथे वेळोवेळी पत्र व्यवहार आंदोलन,मोर्चे,उपोषण केली परंतु आजतागायत आमच्या रास्त मागण्या पूर्ण केल्या नाहीत त्या साठी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पूर्णतः अन्न त्याग करून प्राणांतिक उपवास करेल.आमच्या रास्त मागण्या पुढील प्रमाणे १) आरक्षण उपवरगिकरणा च्यां संदर्भात राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करण्या साठी न्यायिक आयोग स्थापन करावा व वंचित उपेक्षित समाजाला न्याय द्यावा
२)शेगांव शहरातील पुनर्वसित म्हाडा कॉलनी वासियांना मालकी हक्काचां ७/१२ ८अ देण्यात याव्हा,म्हाडा कॉलनीतील शिल्लक सदनिका स्थानिक गरजू लोकांनाच द्यावे
३)लहुजी वस्ताद साळवे नगर चे पुनर्वसन करून त्यांना मालकी हक्काचे घर द्यावे व खळवाडी पुनर्वसनात बे घर झालेल्या १८ कुटुंबियांना त्यात न्याय द्यावा
४) शेगांव शहरतील साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या चौकाचे सौंदर्यकरण करून अण्णा भाऊ साठे यांचां पूर्णाकृती पुतळा बसवण्यात ह्या आमच्या रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे प्राणांतिक उपवास करेल असा इशारा प्रचार प्रसार माध्यमांशी बोलताना नागेश्वर पाटेकर यांनी दिला
